Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

मीडिया ब्रीफ: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अहमदाबादमधील साबरमती नदीवरील पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर

Published Date

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एक भाग म्हणून, अहमदाबादमध्ये साबरमती नदीवर १२ मजली इमारतीइतक्या (सुमारे ११८ फूट) ३६ मीटर उंच पुलाचे बांधकाम वेगाने पुढे सरकत आहे.

हा 480 मीटर लांबीचा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गाच्या समांतर बांधला जात आहे. रणनीतिकदृष्ट्या साबरमती आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांच्या दरम्यान असलेला हा पूल, साबरमती बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे 1 किमी आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे 4 किमी अंतरावर आहे.

पुलाचे सर्व आठ (08) गोलाकार पियर्स, ज्यांचा व्यास 6 ते 6.5 मीटर आहे, पूर्ण झाले आहेत. यापैकी चार (04) नदीपात्रात, दोन (02) नदीच्या काठावर (प्रत्येकी एक-एक दोन्ही बाजूंना) आणि दोन (02) नदीकाठाबाहेर स्थित आहेत. पियर्सची उंची 31 ते 34 मीटर दरम्यान आहे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात कमीत कमी अडथळा येण्यासाठी पियर्सचे नियोजनपूर्वक मांडणी करण्यात आली आहे.

हा पूल 76 मीटरचे 5 स्पॅन आणि 50 मीटरचे 2 स्पॅन यांचा बनलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक स्पॅनचे बांधकाम 23 सेगमेंट्सद्वारे साइटवरच (इन-सिटू) केले जात आहे. याचे बांधकाम बॅलन्स्ड कँटिलिव्हर पद्धतीने केले जात आहे, जी खोल पाण्यात आणि नद्यांवर लांब स्पॅनच्या पुलांसाठी विशेष तंत्रज्ञान आहे. या पद्धतीत पुलाखाली आधार (स्कॅफोल्डिंग) न लावता, प्रत्येक पियरपासून दोन्ही बाजूंना संतुलन राखत सेगमेंट्स क्रमाने जोडले जातात (पोस्ट-टेंशनिंगद्वारे) आणि स्पॅन तयार केला जातो. यामुळे एकसंध आणि स्थिर ब्रिज डेक तयार होतो.

पुलाच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली असून, पाया व सबस्ट्रक्चरशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाली आहेत. 76 मीटरचे तीन स्पॅन पूर्ण झाले आहेत, तर सुपरस्टक्चरशी संबंधित कामे, जसे पियर हेड बांधकाम आणि सेगमेंट कास्टिंग, सध्या सुरू आहेत.

बांधकामादरम्यान नदीच्या पाण्याचा प्रवाह अखंड राहील यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. तात्पुरत्या एम्बँकमेंटमध्ये ह्यूम पाइप कल्व्हर्ट्स बसवण्यात आले आहेत, तसेच नैसर्गिक जलनिस्सारण वाहिनीही कायम ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे पाण्याचा सतत आणि मोकळा प्रवाह सुनिश्चित होतो. या उपाययोजनांमुळे बांधकाम सुरू असतानाही नदीचा प्रवाह अखंड आणि अप्रभावित राहतो.

Related Images