36 मीटर उंच, म्हणजेच सुमारे 12 मजली इमारतीइतका (अंदाजे 118 फूट) पूल, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतर्गत, सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे.
एकूण 480 मीटर लांबीचा हा पूल, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे, ज्याची उंची सुमारे 14.8 मीटर आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही, तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल.
अहमदाबाद जिल्ह्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उड्डाणपूल, पूल, रेल्वे मार्ग आणि मेट्रो कॉरिडॉर यांसारख्या अनेक संरचनांमधून जात आहे. भारतीय महामार्ग काँग्रेसच्या (आय.आर.सी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्वाधिक उंचीच्या बांधकाम बिंदूपासून 5.5 मीटर इतके अनिवार्य उभे अंतर राखण्यासाठी, साबरमती नदीवरील पुलाचे खांब वाढीव उंचीने तयार करण्यात आले आहेत.
एकूण आठ (08) गोलाकार खांब, जे 6 ते 6.5 मीटर व्यासाचे आहेत, बांधण्यात आले आहेत. यापैकी चार (04) खांब नदीच्या पात्रात, दोन (02) खांब नदीच्या काठावर (प्रत्येक बाजूला एक) आणि दोन (02) खांब नदीच्या काठाच्या बाहेर उभारण्यात आले आहेत. नदीच्या प्रवाहात अडथळा कमीत कमी राहावा यासाठी पुलाची रचना खांबांचे धोरणात्मक स्थान ठरवून करण्यात आली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील बहुतांश नदी पूल सुमारे 40 मीटर लांबीच्या छोट्या गप्पांवर आधारित असले तरी, नदीच्या पात्रातील खांबांची संख्या कमी करण्यासाठी या पुलामध्ये 50 ते 80 मीटर लांबीच्या मोठ्या गप्पांचा वापर करण्यात आला आहे.
या पुलामध्ये प्रत्येकी 76 मीटर लांबीचे 5 गप्पा आणि प्रत्येकी 50 मीटर लांबीचे 2 गप्पांचा समावेश आहे. प्रत्येक गप्पामध्ये 23 विभाग (सेगमेंट) असून ते सर्व ऑन-साइट (स्थळावरच) बांधकामाच्या पद्धतीने कास्ट केले जात आहेत. या विभागांचे कास्टिंग अत्यंत अचूकतेने करणे आवश्यक असते आणि यासाठी प्रत्येक टप्प्यावर अत्यंत कुशल मनुष्यबळ व समर्पित टीमची गरज असते, जेणेकरून संरचनेची मजबुती आणि दर्जा सुनिश्चित केला जाऊ शकेल.
हा पूल बॅलन्स्ड कॅंटिलिव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहे, ही एक विशेष बांधकाम तंत्र आहे, जी खोल पाण्यातील आणि नद्यांवरील दीर्घ अंतराच्या पुलांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. या पद्धतीचा मुख्य उद्देश म्हणजे पूल बांधताना त्याच्या खाली स्कॅफोल्डिंग प्रणाली न बसवता, प्रत्येक खांबाच्या डाव्या व उजव्या बाजूने विशेष इरेक्शन इक्विपमेंटच्या साहाय्याने सेगमेंट्स एकामागोमाग एक जुळवून, पोस्ट-टेंशनिंग करून गप्पा तयार करणे आणि अशा प्रकारे पुलाचा सुपरस्ट्रक्चर पूर्ण करणे. यामुळे एक सलग व स्थिर पुलाचा डेक तयार होतो.
पुलाचे बांधकाम करताना सर्वोच्च सुरक्षामानके पाळली जात असल्याची खात्री करण्यासाठी, विशेषतः उंचीवर काम करणाऱ्या क्रियाकलापांसाठी एक मजबूत सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कार्यस्थळी काटेकोर जबाबदारी व शिस्त सुनिश्चित करण्यासाठी संरचित वर्क परमिट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. सर्व कामगारांना पूर्ण वेळ वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पी.पी.ई.) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे, ज्यामध्ये फुल-बॉडी हार्नेसचा समावेश आहे. उंचीवरून पडण्याशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी फॉर्म ट्रॅव्हलर / ब्रिज बिल्डर संरचना खाली कॅच नेट्स बसवण्यात आले आहेत. बांधकाम प्रक्रियेच्या प्रत्यक्ष देखरेखीसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
पुलाच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली आहे. सर्व पाया व अधोसंरचना संबंधित कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, वरील संरचनेची कामे — ज्यामध्ये खांबाच्या शिरोभागाचे बांधकाम व विभागांचे (सेगमेंट्सचे) कास्टिंग यांचा समावेश आहे — सध्या प्रगतीपथावर आहेत.
पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- पुलाची एकूण लांबी – 480 मीटर
- नदीची रूंदी – 350 मीटर
- पुलामध्ये 76 मीटर लांबीचे 5 गप्पा आणि 50 मीटर लांबीचे 2 गप्पांचा समावेश
- खांबांची उंची – 31 मीटर ते 34 मीटर
- 6 मीटर व 6.5 मीटर व्यासाचे 8 गोलाकार खांब
- हा पूल साबरमती आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान स्थित आहे; साबरमती स्थानकापासून सुमारे 01 किमी आणि अहमदाबाद स्थानकापासून सुमारे 04 किमी अंतरावर
- हा पूल भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक असलेल्या साबरमती नदीवर बांधण्यात येत असून, ही नदी अरवली पर्वतरांगांमधून उगम पावते आणि अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला जाऊन मिळते. नर्मदा आणि तापी या नद्याही अशाच प्रकारे पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत.
अतिरिक्त माहिती:
एमएएचएसआर मार्गामध्ये एकूण 25 नदी पूल आहेत, यापैकी 21 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात आहेत.
गुजरातमध्ये नियोजित 21 नदी पुलांपैकी 16 पूल पूर्ण झाले आहेत. हे पूल खालील नद्यांवर बांधण्यात आले आहेत – पार (वलसाड जिल्हा), पुर्णा (नवसारी जिल्हा), मिंढोळा (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), अउरंगा (वलसाड जिल्हा), वेगणिया (नवसारी जिल्हा), मोहर (खेडा जिल्हा), धधार (वडोदरा जिल्हा), कोळाक (वलसाड जिल्हा), वात्रक (खेडा जिल्हा), कावेरी (नवसारी जिल्हा), खरैरा (नवसारी जिल्हा), मेष्वा (खेडा जिल्हा), किम (सुरत जिल्हा), दारोठा (वलसाड जिल्हा) आणि दमणगंगा (वलसाड जिल्हा).

